ग्रामीण वार्ता
Trending

शिरूरमध्ये पार्किंग समस्येवरून अखिल भारतीय मराठा महासंघाचा प्रशासनावर हल्लाबोल: माजी तालुकाध्यक्षांचा खडा सवाल

निर्भय न्यूज लाईव्ह:वृत्तसेवा

ताज्या घडामोडी मोबाइल वर मिळवा.फोटो वर क्लिक करा

शिरूर, [१९ जून २०२५]: शिरूर शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी आणि पार्किंग समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून, याप्रकरणी आता अखिल भारतीय मराठा महासंघाने आवाज उचलला आहे. महासंघाचे माजी तालुकाध्यक्ष संभाजीराजे कर्डिले यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत, शिरूरमध्ये पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. शिरूर ही श्रीगोंदा आणि पारनेर या तीन तालुक्यांसाठी एक प्रमुख बाजारपेठ असल्याने, येथे येणाऱ्या शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांना पार्किंगच्या समस्येमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पार्किंगची सोय नाही, पण दंडाचा धडाका सुरू..!!

कर्डिले यांनी म्हटले आहे की, तालुक्यातील व पंचक्रोशीतील नागरिक जेव्हा प्रशासकीय कामासाठी, खरेदी साठी शिरूरमध्ये येतात, तेव्हा त्यांना आपल्या गाड्या बायपासला लावून दुचाकीवरून शहरात यावे लागते. याशिवाय, पोलिसांनी रस्त्याच्या कडेला थोडी जरी गाडी उभी केली तरी लगेच फोटो काढून दंड आकारण्याचा सपाटा लावला आहे. “पार्किंगची व्यवस्था नसताना पोलिसांकडून सर्रास दंड आकारला जातो, मग या पार्किंगची व्यवस्था कोणी करायची?” असा संतप्त सवाल कर्डिले यांनी विचारला आहे. स्थानिक प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असून, पोलीस प्रशासन दंड मारण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

फलक नाहीत, तरीही दंड का?

पुण्यासारख्या शहरांमध्ये ‘नो पार्किंग’ आणि ‘पार्किंग’चे फलक लावलेले असतात, ज्यामुळे वाहनचालकांना कुठे गाडी उभी करावी आणि कुठे नाही याची कल्पना येते. मात्र, शिरूरमध्ये कोणत्याही रस्त्यावर असे फलक नसतानाही दंड आकारला जातो. यामुळे इतर भागातून येणाऱ्या नागरिकांनी नेमके काय समजायचे, असा प्रश्न कर्डिले यांनी उपस्थित केला आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने याची तातडीने व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे.

अतिक्रमणाकडे दुर्लक्ष आणि आंदोलनाचे आवाहन..!!

कर्डिले यांनी शहरातील वाढत्या अतिक्रमणाकडेही लक्ष वेधले आहे. नको त्या ठिकाणी अतिक्रमण झाले असतानाही त्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे त्यांनी म्हटले. या समस्येबाबत अनेक नागरिक आपल्याला भेटून तक्रारी करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, स्थानिक वृत्त प्रतिनिधींनीही या विषयावर बातम्या लावाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिरूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांनी या विषयावर आंदोलन करावे, असे आवाहनही संभाजीराजे कर्डिले यांनी केले आहे.

शिरूरमधील वाहतूक आणि पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने, प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

शेअर करा

मुख्य संपादक- श्री.अनिल डांगे

निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये